7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावेत असं मला वाटतं? - गेली अनेक वर्ष आरक्षण व्यवस्था operational आहे. कीमान ४ पिढ्यांना त्याचा लाभ मिळालाय असं मानायला हरकत नाही. मग अनेकदा प्रतिवाद केला जातो की मग इतक्या वर्षात काय साध्य झालं? - आणि आरक्षणातून अजूनही ‘जात’ जात नसल्यानं यातून social integration होत नाहीये त्याचं काय? - सोबतच एका लाभार्थ्यांनं या व्यवस्थेचा पुन: पुन: वापर करणं कितपत योग्य आहे? उदा. एका पिढीनं आरक्षणाचा फायदा घेतला आता जर ते समाजप्रवाहात आले असतील तर त्यांना परत जातीच्या आधारावर आरक्षण का मिळावं? हा त्या जातीतल्या अजून आरक्षणाचा फायदा न मिळालेल्या आणि सोबत आरक्षण न मिळणार्या घटकांवर अन्याय नाही का? - यावर मला खालचा सुधार सुचवावा वाटतो सुधार क्र. ०२ :- - या सुधाराच्या सुरुवातीला थोडा मागचा संदर्भ देतो, मुळात एकदा आरक्षणाचा लाभ घेतलेल्या सगळयांचं जीवनमान उंचावलंय आणि ते समाजप्रवाहात आलेत असं घडवलेले नाही कारण पुन्हा पुरेशा संधींची अनुपलब्धता! म्हणून पुन्हा दुसर्या पिढीत आरक्षणाचा फायदा घेणार्या घटकांचं प्रमाण मोठं आहे. - याचीच दुसरी बाजू अनेक आरक्षण प्राप्त घटकांना आपलं जीवनमान उंचावल्यावर कींवा लौकीकार्थानं ‘सेट’ झाल्यावर जबाबदारीने आरक्षण नाकारून त्याचा लाभ त्याची खरचं गरज असलेल्या घटकाला मिंलावा अशी अनेक उदाहरणं मी स्वत: जवळून पाहील्येत मग त्यात राखीव विद्यार्थीनीच्या जागेवर कमी टक्क्यात प्रवेश घेण्यापेक्षा हुशार आहे तर मेरीटलिस्टमध्ये लागेल तिथे घेऊ वाल्या अनेकजणी पाहील्या आहेत, अगदी १०वी पर्यंत मुलींना फुकट मिळणारी पाठ्यपुस्तकं नको म्हणणारी एक तर त्या विषयावर अजूनही बोलते. - सारखंच मी कमावता आहे, मला फी परवडते आणि मुलीकडे अभ्यासाची सर्व साधंनं पण आहेत, ती आरक्षणातून प्रवेश कींवा नोकरी करणार नाही म्हणणारे पालक पण मी ओळखतो! पण तरीही यावर जर उपाय शोधायचाच असेल तर पुरेषा (ते गुणोत्तर मांडावं लागेल!) संधी उपलब्ध झाल्या की खालचा उपाय वापरतां येवू शकतो - प्रवेश असो अथवा रोजगार एका पिढीनं आरक्षणाचा फायदा घेतला तर ती पिढी First Generation Beneficiary मानवी जाईल. - या आरक्षणाचा पुरेपुर फायदा घेत स्वत:चं जीवनमान उंचावण, समाजप्रवाहात आपलं हक्काचं स्थान मिळवणं हे त्या लाभार्थ्याचं कर्तव्य असेल! (हे ऐकायला जरी अगदीच क्रुर वाटलं, तरी आपण स्वीकारलेल्या मिश्र-भांडवलशाहीमुळे compassion साठी इतकंच मार्जिन उरतं!) - यानंतर आरक्षणाचा फायदा घेतलेल्या पिढीची पुढची पिढी Second Generation Beneficiary म्हणून ओळखली जाईल त्या पिढीला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही अशी तरतुद करावी लागेल. - ही तरतूद तात्पुरती असेल. आणि हे फक्त caste based आणि gender based आरक्षणाबाबत लागु होईल. - मुळात Open Market Economy/ Capitalism आणि Socialism चं बोजड Combination यामुळे आपल्याकडे रोजगार/उत्पन्नाची साधनं यांचा काहीच भरोसा देता येत नाही. त्यामुळे ही रचना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला (EBC) लागू होणार नाही! - पण पुन्हा प्रश्न उरतो की भांडवलशाहीमुळे शिवाय बाजारातल्या चढ-उतारांमुळे आज बाजारात पत असलेला माणूस केव्हा दोन वेळच्या जेवणाला पारखा होईल सांगतां येत नाही! - त्यामुळे एका पिढींन आरक्षणाचा फायदा घेतला म्हणजे त्यांच्या अडचणी संपल्या असं नाही, त्यांना त्या अडचणींवर मात करायची एक संधी आणि मदत आपण दिली असं आपण समजू. - पण समजा First Generation Beneficiary’s जर आर्थिक दृष्ट्या सबल होवू शकला नाही तर? - तर सोपं आहे - त्याची पुढची पिढी Caste/Gender based आरक्षणाचा फायदा न घेता आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा फायदा घेईल! (हे फक्त शिक्षणाबाबत लागू)* - समजा जर या दोन पिढ्यांनंतरही आपण कोणा घटकाला समाजप्रवाहात आणायला कमी पडतो तर या मुळ लाभार्थ्याची तीसरी पिढी परत मुळ आरक्षणाचा फायदा घेवू शकेल! - माझ्यामते तरी यामुळे हळूहळू आरक्षण हा मुद्दा जातीच्या भींती पूसत जाईल! - * अर्थात यासाठी टप्प्या टप्प्यानं Caste/Gender Based आरक्षणाचा टक्का कमी होत आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा टक्का वाढला पाहीजे! टीप :- हा सुधार मांडताना किमान उत्पन्न पुरवणारा रोजगार/गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या संधी पुरेपुर उपलब्ध होतील आणि आपापसताले भेदाभेद पुसट होत जातील ह्या गृहीतकावर आधारलेले आहेत! जर राजकीय हव्यासापोटी जातीच्या अस्मिता अजून तीव्र झाल्या कींवा प्रशासन-शासन-न्यायपालिका यांना पुरेशा संधी उपलब्ध करण्यात अपयश आलं तर हा उपाय लागु पडणार नाही! समाप्त! -ईशान गणपुले. (संगमनेर) #LucidAngle
0 Comments
7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? आजच्या आरक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड सुधार व्हायची गरज आहे असं मला वाटतं. सुधार क्र. ०१ -आरक्षण ही मुळात Disadvantaged Setup मधून बाहेर पडण्यासाठी मिळालेली विशेष संधी/मदत/सवलत आहे. पण आज मुळात आरक्षण व्यवस्थेला तिचा उद्देश गाठायला लागणाऱ्या पुरक व्यवस्था थातूरमातूर आहेत. -कसं हे जाणून घेण्यासाठी जरा बाहेर बघूयात! -अनेकांचा गैरसमज असतो की बाहेरच्या प्रगत देशांत आरक्षण नाही, हा गैरसमज आहे. -Racial Integration/Liberalism च्या नावानं तीथे Predominantly Black Colleges जिथे पुर्वी फक्त आफ्रिकन अमेरीकन शिकायचे तिथे गोऱ्या लोकांना प्रवेश राखिव असतात. -मोठमोठ्या Ivy League College/Universities च्या प्रवेश प्रक्रियेत सुद्धा कीती टक्के People of Colour आणि Other Gender वाल्यांना प्रवेश द्यायचे याचं गुणोत्तर ठरलेलं आहे! -हे आरक्षणच झालं! -जसं आपल्याकडे जातीची अस्मिता तिखट टोकदार आहे तशीच तिकडे वंशाची सुद्धा आहेच आणि institutional/Individual Racism चे प्रकार तिथे सुद्धा होतातच पण तिकडे आरक्षणाचा मुद्दा पेटत नाही कारण तिथे संधींची उपलब्धता अमाप आहे! -त्यामुळे आपल्या आरक्षण व्यवस्थेसाठी पहीला पुरक सुधार ‘उत्तम रोजगार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षणाच्या संधी वाढवणं’ उद्याचा भागात- आरक्षण व्यवस्थेतीस सुधार क्र. ०२ "आरक्षण आणि त्याचे Second Generation Beneficiary यांबाबत सुधार" क्रमशः -ईशान गणपुले. (संगमनेर) काल आरक्षण विषयात “आरक्षण म्हणजे काय?”, “आरक्षण नक्की का हवं?”, “आरक्षणाचे निकष मला पटतात का?”, “आरक्षणामुळे गुणवत्तेवर परीणाम होतो का?” आणि “आरक्षण असावं की नसावं?” याविषयावर माझं आकलन मी मांडलं. आज त्यातून पुढे चर्चेत येणारे प्रश्न 6. भारतीय आरक्षण व्यवस्थेचं failure काय?
उद्याच्या भागात :- 7. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? 8. जातीनीहाय आरक्षण जातीअंतामध्ये अडथळा आहे का? 9. आरक्षण हा मुलभूत अधिकार असु शकतो का? क्रमशः - ईशान गणपुले. (संगमनेर) आज गेली २ वर्ष चाललेला ‘मराठा मोर्चा’, भाजपचा निवडणूक जाहीरनामा तथा अनेक समाजधुरीणांचा पाठींबा असलेली ‘मराठा’ समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अखेर विधेयक पारित होत मान्य झाली. आता मराठा समाजास १६% आरक्षणाचा लाभ मिळेल. या निमित्तानं आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गेली काही वर्ष पक्षिय राजकारणविरहीत आणि लोकशाही पद्धतीनं चालणाऱ्या विद्यार्थी चळवळीत काम केल्यानं या विषयाचे विविध अंग मला माझ्या कुवतीप्रमाणे समजून घेता आले, तीच आरक्षणाबाबतची माझी धारणा खाली काही कायम विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करतोय. 1. आरक्षण म्हणजे काय? - माझ्या मते आरक्षण म्हणजे समाजप्रवाहाच्या मागे पडलेल्या घटकांना समाजप्रवाहात आणुन त्यांना जीवनमान-शिक्षण-आरोग्य-रोजगार इत्यादींच्या समान संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था म्हणजे आरक्षण. 2. आरक्षण नक्की का हवं? - स्वातंत्र्यपूर्व काळ ते स्वातंत्र्योत्तर काळ काही अनिष्ट सामाजिक रुढी, चालीरीती यामुळे एक मोठा नागरीकवर्ग समाजप्रवाहाच्या बाहेर सोडला गेला. त्याच्या रोजगाराच्या-शिक्षणाच्या संधी हिरावून घेतल्या गेल्या ज्यामुळे त्यांचे जीवनमान खालावलं, या अन्यायाविरूद्ध राजा राम मोहन रॉय-स्वातंत्र्यवीर सावरकर-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महात्मा गांधी-महात्मा फुले-शाहू महाराज यांसारख्या समाज सुधारकांनी जागरण केलं, या अनिष्ट रूढी-चालीरीती मोडायचं काम केलं. - सोबतच खुली अर्थव्यवस्था उत्पन्नाची तुटपुंजी साधनं, त्यावरचे एकाधिकार शिवाय वाढती नफेखोरी यामुंळे एक मोठा वर्ग आर्थिक प्रवाहाच्या बाहेर राहीला, परीणामी त्यांच्या शिक्षणाच्या-जीवनमान सुधाराच्या संधी दूरावल्या. अगदी समाजवाद-साम्यवाद-भांडवलशाहीच-उदारमतवाद-एकात्ममानववाद यांसारख्या विचारप्रणाली त्यांचे विचारवंत तर ज्युडाईझम-इस्लाम-ख्रिश्चॅनीटी सारखे धर्म विविध राष्ट्रं यांनी आपापल्या पद्धतीनं Economic Models मांडत या विषयाला उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण सर्व व्यवस्थांमध्ये आर्थिक दुर्बल घटक आढळतातच. - शिवाय आजही जगभरात लिंगभेद-पुरुषप्रामण्यवादा सारखे भेद आढळतातच. एका मोठ्या समाजघटकाच्या Gender मुळे त्याच्या शिक्षण-रोजगार-जीवनमान(आरोग्य) हे मिळवण्याच्या संधी आणि मुलभूत स्वातंत्र्यावर गदा येताना आपण आजही बघतो. - पण या दुर्लक्षित/वंचित समाजघटकाला पुन्हा समाजप्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी प्रगतीच्या काही अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जेणेकरून तो घटक पुन्हा समाजप्रवाहात एकरूप होण्यासाठी आरक्षण हवंच. 3. आरक्षणाचे निकष तुम्हाला पटतात का? - होय. - समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी पैसा/रोजगार नसल्यामुळे संधी नाकारली जाणं हा अन्याय आहे, त्यामुळे सामाजिक न्यायाचा मानकांप्रमाणे अशा घटकांना आरक्षण हवंच. - सोबत अनेक दशकं शोषणाचा निकष जर ‘जात’ होती तर आता जर कोणा घटकाला ‘जाती’ मुळे संधी नाकारल्या जात असतील तर आरक्षणाचा निकष देखील जात हवा. - जर शोषणाचा-संधी नाकारायचा निकष लिंग/Gender असेल तर आरक्षणाचा निकष देखील लिंग/Gender हवा. - भाषा-उपासनापद्धती-त्वचेचा रंग-खाद्य-संस्कृती यांसारख्या कुठल्या मुद्द्यामुळे भेद निर्माण करत जर संधी नाकारली जात असेल तर त्या निकषावर देखिल आरक्षण हवं. 4. आरक्षणामुळे गुणवत्तेवर परीणाम होतो का? - नाही, Genuine Excellence हा Statistically खुप दुर्मिळ असतो आणि कुठल्याच परिस्थितीत नाकारतां येत नाही. 5. आरक्षण असावं की नसावं? - असावं असलेच पाहीजे. कारण ज्या सामाजिक घटकाची(नागरीकाची) शिक्षणाची-रोजगाराची-जीवनमानाची संधी त्याची भाषा, जाती, उपासनापद्धती किंवा आर्थिक परिस्थिती मुळे दुरावत असेल त्याला समाजप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हवंच. - आरक्षण ही विविधतेने भरलेल्या समाजासाची Social Reality आहे जी टाळतां येणार नाही, ती टाळणं हा मुर्खपणा ठरेल. उद्याचा अनुदीनीमध्ये - 1. भारतीय आरक्षणव्यवस्थेचं failure काय? 2. आरक्षण व्यवस्थेत काय सुधार व्हावे असं मला वाटतं? 3. जातीनीहाय आरक्षण जातीअंतामध्ये अडथळा आहे का? 4. आरक्षण हा मुलभूत अधिकार असु शकतो का? वरच्या मुद्ंयांवर काही शंका-सुधार-टीका असल्यास कमेंटमध्ये नक्की वाचायला आवडेल. क्रमश: -ईशान गणपुले. (संगमनेर) #LucidAngle Choice of attention – to pay attention to this and ignore that – is to the inner life what choice of action is o the outer. In both cases man is responsible for his choice and must accept the consequences. - W. H. Auden. गेले काही महीने बलात्काराच्या मुद्याची समाजमनाला पुन: आठवण झाल्ये. निर्भयाच्या वेळेला ढवळून निघालेल्या समाजात पुन्हा असंतोष खदखदत आहे. पण समाजमनाचा Attention Span कमी असल्यानं नवीन ज्वलंत मुद्दा मिळाला कींवा कोण्या मुद्यावरून राजकिय गुद्देबाजी रंगली तर हा मुद्दा मागे लोटला जाण्याची पण शक्यता आहे. या सगळ्या चालेल्या गदारोळात भावनाविवश होत, ‘मनुष्य का असा पशुवत वागतो?’ हा प्रश्न अनेकांनी विचारला. मला वाटतं याचं उत्तर रामायणातल्या विभिषणाकडे सापडू शकतं. त्याचं काय आहे की मला रामायणातल्या विभीषणाचं कायमच कौतुक वाटत आल आहे. म्हणजे पहा रावणाचा सख्खा भाऊ पण रावणाची कुनिती आणि असुर प्रवृत्ती आव्हेरून रामाची बाजू घेणारा विभीषण मला कायमच स्टोरीचा unsung hero वाटत राहिला आहे, पुढे युद्धाच्या प्रसंगात रावणाला नामोहरम करण्याची युक्ती त्याने फक्त रामाला दाखवली म्हणूनच नाही तर, मला विभीषण आवडतो ते त्याचा रावणाची अधर्माची* बाजू सोडून धर्माची** बाजू निवडायचा Conscious आणि Active Choice. परिस्थितीचा सारासार विचार करत आपल्या सद्सद्विवेक बुद्धेचा प्रयोग करून भावनाविवश न होता रामाची साथ द्यायचा Conscious आणि Active Choice. मला वाटत वर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या विभीषणाच्या Conscious आणि Active Choice मध्ये दडलंय, गेल्या कालावधीत त्यावर कोणी बोललेलं मला आढळलं नाही किंवा असल्यास इतर गदारोळात त्यांचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही. आता तुम्ही म्हणाल कि Conscious आणि Active Choice चा आणि लैंगिक अत्याचारांचा काय संबंध? तर ऐका, साधारण महिनाभरापुर्वी मी Facebook वर एक प्रश्न विचारला होता. “लैंगिक आत्याचारांमध्ये होणार्या वाढीला माध्यमातील वाढती उत्तेजक जाहिरातबाजी कारणीभूत आहे का?” त्याला १५०च्या मागे पुढे लोकांनी उत्तरं दिली त्यात ८०% लोकांनी त्याला होय अस उत्तर दिलं आहे, तर २०% लोकांना वाटत नाही कि उत्तेजक जाहिरातबाजीचा लैंगिक आत्याचाराशी काही संबंध आहे. आता प्रश्न येतो यातलं काय चुकीच आणि काय बरोबर. माझ म्हणणं आहे कि यात कोण चूक कोण बरोबर हा मुद्दाच नाही या दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. आणि या दोहोंना विभागणारी रेखा आहे ‘Conscious आणि Active Choice’ उदाहरणदाखल बघुयात, हो म्हणणार्यांचा वाद आसतो कि तोंडाला लावायच्या पदार्थांपासुन मग त्यात मेकप, नानाविध क्रीम, दाढीच समान ज्यात Blade, Razor, Aftershave, वेगवेगळी अत्तरे, किवा खाण्या-पिण्याचे समान, कपडेलक्ते, गाडी-घोडे सगळ्याच्या जाहिराती जर भडकावू, द्वयर्थी किवा अंगप्रदर्शनाने बरबटलेल्या असतील आणि साधा साबण किंवा अत्तर घ्यायचं तरी यातून मला मिळणार उपयुक्तता काय याचा साधा विचार न करता माझे माझ्या कल्पनेतल्या जोडीदाराला Impress करायच्या किंवा त्यांच्याशी ‘जवळीक’ वाढवायच्या संधी किती वाढतात याचा विचार केला जातो. प्रत्येक वस्तूला अशी वासनेची जोड देवून जाहिरातबाजी केली तर आजच्या युगात मनावर आणि परिणामी कृतीवर ताबा राहणार का? हळूहळू ह्या जाहिराती आपल्या मनातल्या वासनेच्या रावणाला मोठ करायचं काम करतो. म्हणून सध्याच्या या वातावरणाला हे भडकावू Media Exposure जबाबदार आहे असा ह्याचं म्हणणं. तर नाही मानणाऱ्या २०% वाल्यांचा प्रतिवाद सांगतो त्या जाहिरातींचा पगडा आमच्या मनावर बसायचा प्रश्नच येत नाही कारण त्या जाहिराती कितीही भडकावू झाल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही कारण आम्हा नवविभीषणांनी मुळातच Consciously आणि Actively ‘राम’ निवडलाय. मग होकार भरणारे ८०% म्हणतात कि सध्याचा माध्यमांचा वाढता प्रभाव आणि माध्यमाचे वाढते पडदे (आधी फक्त TV होता, आता Mobile, Smart Watch किंवा इतर Wearable Tech) बघता विभिषण Conscious आणि Active Choice घ्यायला समर्थ आहे का? का आजचा विभीषण त्या माऱ्यापुढे इतका हतबल झालाय कि तो त्याचा तर-तमभाव, सद्सद्विवेक सगळे हरवून बसलाय? मुळात असा Conscious आणि Active Choice करायला तो ‘जागा’ आहे का? का बिनचेहर्याच्या गर्दीचा भाग बनून दिसामासाने वेगवान होणार्या जीवनमानाचा पाठलाग करण्यात पिचलाय? मुळात मानवी स्वभावाला द्वंद्व नवीन नाही. मुळात बर्याचदा निरुपण करताना अनेक कथाकार रामायणाचे दाखले देतात एका अर्थाने आपण प्रत्येकजण विभीषणच असतो, मनात राम-रावणाच तुंबळ युद्ध चालू असताना आपल्याला निवड करायची असते. आपण रामाची बाजू घेणार कि रावणाची. पण ती निवड करण्यासाठी लागणारा मनाची स्थिरता डोक्यात पदवीच्या चकचकीत व्रॅपर मध्ये मिळणारी नानाविध रीकामचोट माहिती भरुन येत नाही!! ती येते संस्कारक्षम, प्रयोगशील आणि स्वत: Application नं परखुन घेतलेल्या ज्ञानाने! जोवर दुबळी शिक्षण व्यवस्था या प्रकारचं गुरगुरायला लावणारं शिक्षण देणार नाही तोवर हे विभिषणाचं वाण कोणाला समजणारच नाही अन् वासनेत गुरफटलेले अापण पुन्हा पुन्हा खुशाल रावण निवडु! **, * :- धर्म इथे त्याच्या मुळ स्वरुपात अर्थात ‘कर्तव्य’ या अर्थासह वापरला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिल्लीतल्या फटाक्यांच्या विक्रीवर न्यायालयानं लादलेल्या बंदीचा विषय चघळला जातोय. एक कार्यकर्ता आणि एक नागरीक म्हणुन काही प्रश्नांना उत्तरं द्यावीत म्हणुन लेखन प्रपंच! प्रश्न १) तु नाही का फटाके उडवत? - लहानपणा पासुन आजोबांचा अस्थमा मुळे आमच्याकडे फटाके उडवत नाहीत, पण आजोळी गेल्यावर दिवाळीच्या सुट्टीत आतीशबाजीचे कमी धुराचे काही आणि बक्कळ टिकल्या बंदुका उडवायचो. सण साजरा करताना विेवेकबुद्धी आणि तारतम्य महत्वाचं! प्रश्न २) कोर्ट फक्त हिंदु सणांवरच का भाष्य करतं, हा कोर्टाचा पक्षपात नाही का? - नाही! मुळात कोर्टाचे हात कायद्यांनं बांधलेले आहेत, कोर्टासमोर जर कोणी जनहीतार्थ याचिका दाखल केली (हिंदु सणांविरुद्धच जास्ती होतात हे मान्य!) आणि त्यात व्यवस्थित मुद्देसुतपणे पुराने मांडले तर त्यावर कोर्टाला निर्णय घ्यावाच लागतो! अन फटाक्यांमुळे प्रदुषण होत नाही असं कोणाला वाटत असेल तर त्याच्याइतका मुर्ख तोच! आणि मुळात आत्ता कार्टाच्या फटाके बंदीचा विरोध करणारे कोणी वैज्ञानिक पद्धतीनं सर्वेक्षण करुन ख्रिस्ती नववर्षाच्या फटाक्यांनी होणार्या प्रदुषणावर किंवा ईदच्या कत्तलींवर शोध निबंध लिहीत नाही की जनहीथार्थ याचिका दाखल करत नाही! ती केली पुरेसा (उपलब्ध असेलेलाच!) पुरावा मुद्देसुतपणे मांडला तर तेव्हा पण कोर्ट बंदी घालेल! मग हे संविधानीक मार्ग न अवलंबता केलेला हा असहकार वांझोटा नव्हे का? त्यामुळे हा कोर्टाचा पक्षपात नाही तर इतर सणांबाबत इतका अभ्यास करायला आपण सक्षम नाही असं मला वाटतं! प्रश्न ३) मग होळीचं काय?? - धार्मिक उदाहरण देतो ‘उमा बटु संवाद:’ मधे बटुचा वेश घेतला शंकर, पार्वतीला कठोर तपश्चर्येनं शरीराला ताण देवु नकोस असं सांगतो त्याचं वाक्य आहे की ‘शरीर हा माणसाचा पहीला धर्म आहे!’ मग शरीर धर्मासाठी आवश्यक शुद्ध हवा, पुरेशी संसाधनं मिळणार नसतील तर आपले सण साजरेकरायच्या पद्धतीत कालानुरुप बदल व्हायला नको का? मग ९-९ फुटाची होळी प्रत्येक चौका-चौकात दहन करण्यापेक्षा ४-४गौर्यांची घरासमोर केली तरी त्यात मनातल्या होलिकेचं दहन होतंच की! प्रश्न ४) मग रंगपंचमीचं काय? -ती सुद्धा कोरड्या रंगानंखेळलेलीच बरी! कारण पुन्हा अनेक गावांना प्यायला पाणी नसताना आपल्याला उपलब्ध आहे म्हणुन ते वाया घालवण्यात काय सण? (मी या रंगपंचमीलाच फक्त कोरडे रंग खेळणार असं निक्षुन सांगीतलेलं पण इतर खेळणार्यांनी ‘जाउदे रे कुठं कोण तुला विचारतंय म्हणुन भिजवलेलं!!) प्रश्न ५) समजा उद्या कोणा उपटसुंभानं आमच्या दहन विधींवर प्रश्न उपस्थित केला तर काय करायचं? - मला तर वाटतं यावर सर्वांनी सावरकरांचे शब्द स्मरावेत की काळाच्या ओघात ज्या प्रथेचं महत्व बदलेल ती प्रथाच बदललेली बरी!! मग दहन संस्कारासाठी विद्युतदाहीनी आहेच. (पण या अटीवर की तीच्यासाठी वापरली जाणारी विज ही अपारंपारीक संसाधनं वापरुन निर्मिलेली असावी!) प्रश्न ६) मग त्या इदच्या कुर्बान्या, ख्रिस्ती नववर्षाचे फटाके, ख्रिसमसचे फटाके त्याचं काय? - प्रत्यक्ष संपुर्ण बंदी साठीच हा प्रयत्न आहे पण आपला अट्टाहास आपल्या सणांची बदनामी करतोय, हे कुठेतरी थांबायला हवं! आणि मुळात ही बाजु फार लंबे डायलॅाग न देतां कुठल्याही धार्मिक भावना न डिवचता वैज्ञानीक तर्कांनी उभारली पाहीजे! उगा ते मुके प्राणी मारतात म्हणायला अर्थ नाही देवीला बकरा कापुन गावाला नैवेद्य आपल्यातही असतो! बंदी हवी असेल तर नीट मुद्देसुत बाजु मांडली पाहीजे नुसता अट्टाहास का करायचा की ख्रिस्ती नववर्षाच्या फटाक्यांवर बंदी घाला मग दिवाळीचं बघु? बंदी गेली चुलीत आमची परंपरा किंवा कोण कोर्ट आम्हाला सांगणार उलट १०००ची नाही आता ५०००ची लड लावतो हे चुकीचं नाही का? आपल्या या फोल अस्मितेपाई दिवाळीचं मांगल्य जातय! Yesterday For whole evening or so mainstream media channel ran a story titled "शहीद कि बेटी पर सवाल क्यूं?", from the looks of it it seems a simple issue of a girl being targeted by Goons on social media, yet the reality is quite different. Gurmehar Kaur is a daughter of a martyr who a few days ago in a video she made, questioned the political will of Governments of two neighbouring nations to resolve the conflict between them which has been ongoing for at least 60 years. She got trolled on social media by trolls and all Media houses went haywire! Making Prime time rush, Portraying this to be a act of senseless cyber bullying of her! Commenting How her freedom of speech was being robbed and How martyrdom of her father was being questioned! but is that the case? Let us see, while everyone is high on the ruse of Gurmehar Kaur the underlying issue is being pushed out of public conscious and no one seems to care for that. well it all started when JNU Student and one of main accused of Sedition Charges in 9th Feb 2016 JNU Incident Umar Khalid was invited as a Speaker on a Panel at a event organised at Ramjas College in Delhi University's North Campus. The Student Union of Ramjas college opposed the Idea of Umar being any worthy of Inspiring Youth in right Direction and Opposed him addressing Students in Said event. ABVP stepped in supporting the stand of Student Union of Ramjas College against Umar. Protests were held in campus and as the strategy of left goes they started to gather saying how ethos of ohh so liberal campus of DU is being polluted! How free thought amngst student is being suppressed by ABVP! and to protest that they chanted the slogans of "आजादी" again (demanding Aazadi of kashmir and bastar) in Campus of Ramjas in presence of a Faculty which is seen again and again in a video. The Protesters turned violent when considering the objection of Students from Ramjas the event was canceled by authorities and in fallout of it activists from ABVP were beaten, Girls were thrashed & Molested, Stones were pelted and left blamed ABVP for this violence. Yet as no one can hide the rising sun, The truth came out as photo evidence showed SFI State President Attacking a protester along with several eyewitness records, proving Left goons Instigated the Violence. Lo and Behold the left was robbed of the opportunity of playing the victim. Enter Gurmehar, as she posted a Photo of her holding a placard saying she is not afraid of ABVP and every student in India was with her. Coupled with her previous video by Voice of Ram stating "Pakistan didn't kill my father War Did!" Gurmehar was Trolled on social media for her uneducated and narrow approach! again I don't support the rigorous trollin of her by netizens and I absolutely stand with her condemning all those goons who made Rape and Death threats at her! and yes as if yesterday ABVP has filed a complaint with authorities demanding through investigation and harsh action against these trolls! the Failure of Left to cash in on their Victim chip powered the rise of Gurmehar in public conscious. The gambit of Left seems to be working as NSUI the Left organizations all are trying to target ABVP over Gurmehar and the questions of Goondaism, Freedom of Speech, Personal Liberty and the Liberal ethos of campus are again being asked by Left as the fulcrum of Gurmehar has provided them with enough swing to turn the matter on its head! See the question of Umar being a speaker at a campus event id faded away and all we hear is how ABVP is endorsing Hooliganism in campus or how authorities are suppressing the voice of student i.e. Gurmehar yet No one asks the question of what Umar was going to inspire students in said event? Why Left is reluctant to discuss that? and is the ABVP's right to speak up against the event! the preposterous slogans of Aazadi! Faulty logic of Gurmehar saying even though Pak Invaded our nation they diden't killed her father! It's upto us now to stand up and stand tall above this smoke screen of lies, Come together and speak up against these so called Intellectual and Phoney advocates of Free speech that they are overstepping the line between Freedom of Expression and Sedition, Provoking Debate but are running from it! Twisting the facts and are milking the anti authoritarian sentiment of student using him as pawn! and Yes they should stop shifting the focus of debate from Umar to Gurmehar further politisizing the matter! Few days ago our government enacted a ground breaking policy to flush out black money. The demonetisation came as a shock to us all when PM himself dropped it upon us while addressing the Nation. Being a country so used to men with no political willpower governing us, we didn't expect this kind of move to be made by government! For more than 50 years we were accustomed to the arrogance of neta's. We were unbothered by the vermin of corruption till its cancerous growth started affecting us. Then we tried to call upon our then government whom we so ignorantly elected. The government in past themselves neither had a will nor interest to take it upon themselves to fight against problem of Black money. And it was a open secret why! In respect of such a complex democracy as we are and past experiences with Indian people the reaction of public is always considered to be negative or opposing to a big move like demonetisation. All mediums and individuals alike expect masses to react aggressively and almost always opposing the move undertaken by government, even it benefits them all. The common logic evolved from it which is undertaken by all ruling governments is to enact change gradually. Due to the fear of resistance or a potential uprising no government in past ever made huge moves as one made by current PM, and Kudos to him his gamble seems to pay off!! After his speech on that faithful evening where he marked the Start of Demonetisation, the nation was set ablaze! Each and every individual was thunderstruck and panic kicked in. But after first two days and PM's address in Goa, panic was subsided and Lines began to emerge outside banks for deposits and withdrawal. Lines grew longer and longer waiting for hours turned into days yet no chaos, stampede, violence of any kind was reported. It was quite shocking for people to react so calmly and to digest this change positively. The decision was so unexpected that all opposing parties were so shocked they couldn't even decide their position on demonetisation. But after few days they've found their young's and now are criticizing government while producing half baked arguments. They are trying to provoke commoners to react as they expect us to, in violent fashion and against the government. Yet we the people having grasped the reason behind this big move are suffering a little to gain much more. Now standing in queues helping one another and working collectively to destroy the cancer of black money defines our National Spirit! So to all my brothers and sisters standing in lines, Standing beside each other shoulder to shoulder in war against black money I salute you!! Jai Hind!! December 16th, 2012 a medical student from Delhi was gang reaped and murdered. A CNN news report states that it was the tipping point of Indian Society. The suppressed rage against poor safety condition of women met its catastrophic end. People took on to the streets agitating, Demonstrating against the heinous crime of accused. Frantic media showed a nation wide coverage of events. A Anti-Rape sentiment was on high and various debates and discussions ensued all over the nation. the trial of accused began, The media frenzy trial concluded and the accused were sentenced accordingly. Yet again a 27 year Law student Jisha was raped and brutally mutilated by goons in Kerala on April 28th of this year. The events that followed are the same. Students, Activists and all the concerned citizens of India are crying for justice. After 2012 the central government has changed, they've promised and have partially tried to adopt new policies to tackle the situation, but seeing the consistent number of atrocities against women and a utter failure of us as a society to create a safe environment for women the outrage today is new but the reasons are old. The boom in population made our government, Police and investigative agencies overwhelm I.e. Ineffective. The proportion of police to population is so low in our nation that the effective (and Long) hands of Law fall short in this matter. The sheer mass of population our agencies have to police is So vast keeping track or even detecting possible predators is impossible. And we can't Blame our police or investigative agencies, as without proper assets, proper tech and training all they can do is keep calm and carry on to do their job as best as they can do. Along with it our population boom, Due to influence of 'L.S.D.' i.e. western culture our moral code which was iron clad a few decades ago went haywire! The failure of faulty education system which was relic of past educational mechanism propagated by Macaulay leading individuals away and ashamed of Indian Culture made them morally corrupt. The 'Chalta Hai' era of civic life began and we couldn't care less about all these issues, till they directly concerned us. The lack of morality led to a insecure and dangerous atmosphere for woman. Yet we believe after 'Nirbhaya' things will change our united will would motivate us towards a better future. We were wrong, the piling cases of offences against women prove the failures of us as a society and as nation. It is time for us again rise and take responsibility upon ourselves not to let this happen again. To strengthen the public services, Police and investigative agencies and our policies. Make our education better, (more leaning towards giving knowledge and less on providing information!) To shape our minds through education be moral, to be supportive to be primitive and to be protective of Safe and secure environment for women! काल World Intellectual Property Day, अर्थात जागतिक वैचारिक (बौद्धिक) मालमत्ता दिवस होता! आपण भारतीय आपल्या देशाला विद्वत्तेचे आगार समजतो, आमच्या सारखे आम्हीच अस फार गर्वाने म्हणतो मग, भूतकाळात विद्वत्तेच जागतिक किर्तीच केंद्र असणार्या आपल्या देशाची काय परिस्थिती आहे? सुमार दर्जाच शिक्षण, अशिक्षितता असे मुद्दे सांगून माझ्या प्रश्नच उत्तर मिळणार नाहीये त्यामुळे मीपण त्या वाटेला जाणार नाही. सरकार कुठे हि कोणाचही असो पण गेल्या काही वर्षात शिक्षणाचा टक्का निखलासपणे वाढला आहे. आभ्यास क्रमात होणारे नवे नवे बदल, शिक्षणात औषधापूरती का होईना पण प्रात्यक्षिकांवर आधारित मुल्ये आली आहेत. पण मग जगाचा मापदंडाने पहायचं ठरल तर मग पाहिजे तेवढे पेटंटसाठी अर्ज का जात नाहीत? ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, कॉपीराईट असल्या बाबींमध्ये आपण मागे का? खाली दिलेल्या माहिती तक्त्यामध्ये आपला क्रमाक शेवटचा का? जागतिक दर्जाच संशोधन, काव्य, संगीत, चित्रपट किवा ईतर गोष्टी आपण तयार करू शकत नाही अस तर नक्कीच नाही! पहा म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर जगातला दुसरा मोठा देश आहोत! जगातली तिसरी सगळ्यात मोठी उच्चशिक्षण व्यवस्था (अमेरिका आणि चीन नंतरची) आपली आहे! २००१ च्या Census प्रमाणे भारतात एकूण ३७,६७०,१४७ पदवीधर आहेत! पैकी २,५८८,४०५ अभियांत्रिकी! गेल्या पंधरा वर्षात हा आकडा नक्कीच ३० लाखाच्या पुढे गेला असणार! मग आमच्या ‘जुगाडू’ डोक्यातून नव-नवीन कल्पना निघणे थांबलाय का काय? का त्या कल्पना ति स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीची धमक आमच्यात कमी आहे? मुळात आजच्या शिक्षण व्यवस्थेला किवा परीक्षापाद्धतीला दोष देण्या ऐवजी मला अस म्हणायच आहे कि आजचा आपल्या भोवतालच्या Information Boom मध्ये आपल्याला ज्ञान मिळतंय का? आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्यायला भाग पडणार काही आपल्या अभ्यासक्रमात आहे का? आज समाजासमोर बर्याच समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लागणार सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हाव म्हणून आपली शिक्षण व्यवस्था काय प्रयत्न करते? का फक्त १०वी पर्यंत समाजसेवेचे ३ तास दर आठवड्याला घेऊन मुलांमध्ये जाणीव निर्माण होणारे? पुस्तकांचाही पलीकडे जाऊन Imagination, Creativity दाखवता येते हे आपण विद्यार्थ्यांना केव्हा सांगणार आहोत? लोक म्हणतात एखाद्या गोष्टीची Engineering Connections आम्हाला Discovery चेनेल वरून किंवा Google वर शोधून सहज मिळतील, अर्थातच! तुम्हाला माहिती मिळेल, पण माझा प्रश्न आहे ज्ञानाच काय? Information + Imagination + Practical + Realisation = Knowledge मग आपली गाडी Informationच्या पुढे केव्हा जाणार? प्रत्यक्षात एखादी गोष्ट माहित करून घेऊन मग त्यावर प्रात्याक्षिके करून त्यातून तुम्हाला त्या गोष्टीच ‘ज्ञान’ होण हि प्रक्रियाच आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीनी खुडून टाकल्ये! मग आम्हीपण आमचा मुलांना टक्केवारीच्या शर्यतीत पळायला पाठवून देतो! ज्याला टक्के जास्त, ज्याला कविता तोंडपाठ तो हुशार पण त्या टक्केवारीचा प्रत्यक्षात काय उपयोग? टक्केवार फक्त दाखवते कि दिलेली माहिती तुमचा मुलगा किती टक्के लक्षात ठेऊ शकतो! पण जर त्या माहितीचा आधारावर नवनिर्मिती कशी करायची हेच त्यांना शिकवलं नाही तर काय होणार? नवनिर्मिती जाऊदे त्या साठवलेल्या माहितीचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा हेच आम्हाला माहित नाही मग आमचा मेंदू हा फक्त माहितीच डम्पिंग ग्राउंड नाही का होणार!! हे प्रश्न आपण अनुत्तरीत सोडतो! मग मला अच्युत गोडबोलेंच वाक्य आठवत, “हजारो आईनस्टाईन अन न्यूटन आमच्या कडे भीक मागत फिरत आहेत” खर आहे ते! अन या सार्याचा दोष पण फक्त पालकांचा, शासनाचा किवा शासनकर्त्या पक्षाच्या पुढाऱ्यांचा आहे अस नाही! कायम मेकोलेच्या शिक्षण पद्धतीला दोष देण सोडून पुढे आम्ही एक सर्वांगी सर्व स्पर्शी विचार करायला आपण भारतीय म्हणून कमी पडलो हे आता कुठे तरी मान्य करून ह्या सार्यावर धर्म, पंथ, राजकीय आथवा वैचारिक मतभेद सोडून निदान पुढचा पिढ्यांना तरी पढतमुर्ख बनण्यापासून थांबवण्यासाठी याचा विचार व्हायला हवा हिचा अपेक्षा! |
Archives
January 2019
Categories
All
|